सोयाबीन नियोजन

♦️ सोयाबीन पिकाची लागवड : मजुरांची कमतरता व त्रास, उत्पादनात ह्रास या कारणाने कापूस पीकाला फाटा देत अनेक शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. विदर्भ व मराठवाडा या विभागात सोयाबीन हे पिक मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पिकानंतर रब्बी मध्ये दुसरे पिक घेता येत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पिकाकडे जास्त झाला आहे.

मित्रांनो 6 ते 8 क्विंटल एकरी सोयाबीन उत्पादन घेणारे शेतकरी तंत्र वापरून 12 ते 20 क्विंटल पर्यंत सोयाबीन उत्पादन घेतांना दिसून येत आहे. सोयाबीन नंतर हरभरा व त्या नंतर उन्हाळी तीळ असे तिहेरी पिक माझ्या मार्गदर्शनात मागील 4 वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी घेतले आहे. सोयाबीन- 12 ते 20 क्विंटल, हरभरा 12 ते 18 क्विंटल व तीळ - 6 ते 10 क्विंटल पर्यंत शेतकरी घेत आहेत.

♦️ 1. जमिनीची मशागत : सखोल नांगरणी करून 40 - 45 दिवस जमीन चांगली तापू द्यावी. जमिनीत असणारे शत्रू कीटकांचे कोष जसे चक्रीभुंगा, खोडकिडा, खोड आळी, शेंगा पोखरणारी आळी, उंटआळी, पाने खाणारी आळी यांचे कोष नष्ट करावे या करिता जय संजीवनी - 5 किलो व सुपर फॉस्पेट - 1 बॅग शेतामध्ये शिंपून हे कार्य करू शकता.

♦️ 2. वाणाची निवड : पिके 472, जे.एस -335, फुले कल्याणी, ग्रीन गोल्ड, फुले किमया, रुची 1001, जे एस 9305, के. डी. एस 103, के. डी. एस 225 या पैकी वाण निवडावे. (घरचे बियाणे असल्यास प्राधान्य द्यावे. परंतु 2 वर्षा पेक्षा जास्त जुने बियाणे घेऊ नये व 100 दाणे घेऊन उगवण शक्ती तपासून घ्यावी.)

♦️ 3. बियाणे प्रक्रिया : भारी जमीन असल्यास एकरी 15 किलो व मध्यम किवा हलकी जमीन असल्यास एकरी 20 किलो बियाणे घ्यावे. बियाण्यास पुढील प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. पहिल्या दिवशी बियाणे तप्पड वर टाकून
स्कायगोल्ड जेल- 100 ग्राम + ब्लू कॉपर- 50 ग्राम
500 मीली पाण्यात द्रावण करावे व बियाण्यावर शिंपडावे व फारी/ तप्पड हलवून बीज प्रक्रिया करून घ्यावी व रात्रभर बियाणे वाळवून घ्यावे.

♦️ 4. अंतर : भारी व काळीची जमीन असल्यास 2 सऱ्यामधील अंतर 2 फुट ठेवावे. मध्यम व हलक्या जमिनीत हे अंतर 1.5 फुट ठेवावे. आंतरपीक तूर लावावयाची असल्यास हे अंतर 6:1 किवा 8:1 असे ठेवावे .

♦️ 5. खत व्यवस्थापन : पेरणी सोबतच पुढील प्रमाणे खत टाकावे. डी.ए.पी किवा 20:20:0:13 -1 बॅग, सुफर्ट -10 किलो ब्लक डायमंड - 10 किलो.

♦️ 6. पहिली डवरणी : पेरणी पासून 15-20 दिवसांत करावी व दुसरी डवरणी पेरणी पासून 30-35 दिवसांत करावी.

♦️ 7. तन नाशक फवारणी : पेरणी पासून 15 ते 20 दिवसांत ताननाशकाची फवारणी करावी मात्र प्रत्येक टाकीत स्कायगोल्ड जेल - 20 ग्राम टाकावे किवा कॅप्टन - 30 मीली टाकावे. म्हणजे आपल्या पीकाला तणनाशकामुळे होणारे नुकसान टाळता येते. आवश्यक असल्यास 1 - 2 वेळेस निन्दन करून घ्यावे व होता होईस्तर तणनाशक फवारणी टाळावी.

♦️ 8. पहिली फवारणी : पेरणी पासून 20 ते 24 दिवसांत पहिली फवारणी पुढील प्रमाणे करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
स्कायगोल्ड जेल 25 ग्राम
मॅकप्लस 5 मि.ली
एलीयट 15 ग्राम
या फवारणी मुळे पांढर्या मुळ्या सुदृढ होऊन फळ फांद्या भरपूर फुटतील.

♦️ 9. दुसरी फवारणी : पहिली फवारणी झाल्यानंतर लगेच 7 व्या दिवशी करावी. चाम्पियन - 1 मीली, गोल्ड रूट टबलेट - 1 गोळी, फायर 101 - 25 मीली हि फवारणी झाल्यानंतर आपल्या पीकाला उप फळ फांद्या मोठ्या प्रमाणात फुटण्यास मदत होईल व कोणत्याही प्रकारची आळी येणार नाही.

♦️ 10. तिसरी फवारणी : आपले अंतर 2 फुटाचे असल्यास लागवडी पासून 35 दिवसाला फोटान - 7 मीली, वीगो-25 ग्राम व मार्शल -25 मीली प्रती पंप फवारणी करावी. हि फवारणी झाल्यानंतर आपणास चमत्कार पाहण्यास मिळेल.

♦️ 11. चवथी फवारणी : आपल्या पिकावर 10 - 20 फुले दिसल्या नंतर लगेच पुढील प्रमाणे फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
अविष्कार 5 मि.ली
शक्तिमान गोल्ड 25 मी.ली
प्रोक्लेम 10 ग्राम
सोनाटा - 70 20 मि.ली
हि फवारणी केल्यानंतर 8 - 10 दिवसांत आपल्या पिकावर भरपूर फुले लागलेली दिसतील .

♦️ 12. शेवटची फवारणी : हि फवारणी चपली बनत असतांना करावी
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
फ्लॉवर किंग 1 मिली
तेजस 25 ग्राम
संपदा 25 ग्राम
जीब्रॅक्स 25 मीली
फायर 101 25 मीली


♦️ 13. अधिक माहिती : सोयाबीन पिकावर येणारे किडी - खोड आळी, खोड किडा झाडा वरील शेंडा सुकून झाड खालपर्यंत सुकत जाणे, झाड उपटून व चिरून पाहिल्यास आतील गाभ्यात आळ्या दिसतात. चक्रीभुंगा पिकाच्या शेंड्याला 2-3 इंच खालून डंख मारून रस शोसून घेतो व शेंडा गळून पडतो. उंट आळी, केसाळ आळी, शेंगा पोखरणारी आळी, पाने कुरतडणारी आळी तसेच यलो मोजक व बुरशीचे ठिपके वरील प्रमाणे पिकावर प्रादुर्भाव येण्याची शक्यता असते.

♦️ टीप : येलो मोजॅक दिसून आल्यास ताबडतोप गो मोजॅक या घटकाची फवारणी करावी

तीळ पिक नियोजन

मित्रांनो माझा एक अभ्यास असा आहे कि रोग आल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोगच येवु नये ही काळजी घेतली तर उत्पादनात यश येते. तिळ हे पिक आपल्या विदर्भ व मराठवाड्यातुन लोप पावत चालले होते. परंतु मागील दोन वर्षापासून बरेचसे शेतकरी माझ्या तंत्रानुसार सोयाबीन नंतर हरभरा नंतर तिळ असे तिहेरी पिक घेत आहेत. एकरी 15 ते 18 क्विंटल पर्यंत सोयाबीन, 12 ते 18 क्विंटल पर्यंत हरभरा व 6 ते 10 क्विंटल पर्यंत तिळ असे तीन पिक एकाच एकर मधुन घेतल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये चांगलीच भर पडली आहे.

♦️ जमिनीची मशागत : हरभरा काढल्यानंतर जमिनीची चांगल्या प्रकारे वखर पाळी करुन घेतल्यानंतर दोन सरीमधील अंतर 2.5 ते 3 फुट ठेवावे. आपल्या दोन रोपा मधील अंतर 6 इंच ठेवावयाचे आहे हे लक्षात ठेवावे.

♦️ बियाणे निवड : बाजारात उपलब्ध असलेले संशोधित जातीचे बियाणे आपल्या आवडीनुसार घ्यावे. अथवा घरचे बियाणे असल्यास ते सुध्दा घेवु शकतात. प्रति एकरी दिड ते दोन किलो बियाणे घ्यावे.

♦️ बिज प्रक्रिया : एकरी 2 किलो बियाणे घेणे : स्कायगोल्ड जेल - 30 ग्राम + बावीस्टीन 30 ग्राम यांचे द्रावण तयार करून बीज प्रक्रिया करून रात्रभर बियाणे वाळू देणे.

♦️ खताची पहिली मात्रा : खताची पहिली मात्रा पेरणी सोबतच द्यावी
( प्रमाण : प्रति एकर )
20:20:0:13 1 बॅग
सुफर्ट 10 किलो
ब्लॅक डायमंड 10 किलो

♦️ पहिली फवारणी : लागवडीपासुन 16 ते 18 दिवसात फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
स्कायगोल्ड जेल 25 ग्राम
मॅकप्लस 5 मि.ली
रोको 20 ग्राम
फायर 101 25 मि.ली
♦️ या फवारणी नंतर लगेच 7 व्या दिवशी चाम्पियन - 1 मीली गोल्ड रूट टाब्लेट - 1 गोळी याची फवारणी करावी.

♦️ दुसरी फवारणी : पेरणी पासुन 32 ते 36 दिवसात किवा फुले दिसू लागताच एकरी 30 किलो युरिया शिंपुन पाणी देणे व दुसरी फवारणी लगेच करणे.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
एलीयट 20 ग्राम
अविष्कार 5 मि.ली
शक्तिमान गोल्ड 25 मि.ली
सोनाटा 70 25 मि.ली

♦️ तिसरी फवारणी : 55 ते 60 दिवसात पाणी देवून फवारणी
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
तेजस 25 ग्राम
जीब्रॅक्स 25 मि.ली
संपदा 25 ग्राम

♦️ अधिक माहिती : या पिकावर थायलेडी, अनुजीवी ठिंबके व मररोग तसेच रोप कुरतडणारी काळी अळी यांचा प्रादुर्भाव होतो. फवारण्यामध्ये याचा विचार केलेला आहे.

भुईमुंग पिक नियोजन

♦️ भुईमुंग हे बहुउपयोगी पिक महाराष्ट्रात अनेक भागात घेतले जाते. खाद्यतेल देणारे हे पिक जनावरांसाठी उत्तम पेंड सुध्दा देते. खरीप, रब्बी व उन्हाळ्यात सुध्दा पिक घेता येते. भुईमुंग वरील किड व रोग व्यवस्थित पणे नियंत्रणात ठेवल्यास उत्पादन चांगले घेता येते.

♦️ भुईमुगावरील किड : मावा, तुडतुडे, फुल किडे, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, हुमणी.

♦️ भुईमुंगावरील रोग : पानावरील ठिपके (टिक्का), तांबेरा कळी, करपा, मर किंवा मुळकुज, माझ्या तंत्रामध्ये वरील किडींचा व रोगांचा बंदोबस्त फवारण्यामधुन करण्याचा प्रयत्न केला आहे.

♦️ पाऊस पडण्याचा कालावधी कमी असलेल्या भागात जसे पाऊस जुन जुलै मध्ये सुरु होवुन सप्टेंबर अखेर बंद होत असल्यास अशा भागात कमी कालावधीचे वाण 90 ते 120 दिवसाचे उपटया जातीचे बियाणे निवडतात व जुन महिन्यापासुन नोव्हेंबर अखेर पर्यंत ज्या भागात पाऊस चालु असतो. अशा भागात 120 ते 150 दिवसात तयार होणारे वाण पसऱ्या व निमपसऱ्या जातीचे घेतल्या जातात.

♦️ जमिनीची मशागत : हलकी ते मध्यम व पाण्याचा निचरा होणारी जमिन जी भुसभुशीत असणे आवश्यक आहे. चिबाड अथवा चोपन जमिनीत भुईमुंग लागवड करु नये. सखोल नांगरट करून कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या देवुन जमिन भुसभुशीत करावी. तयार केलेले शेणखत असल्यास घ्यावे, सपाटीकरण केलेल्या जमिनीवर पाणी देण्यासाठी 2 ते 4 मीटर रुंदीचे सारे तयार करावेत.

♦️ बियाणे निवड प्रक्रिया : उन्हाळी लागवड करावयाची असल्यास ए.स.बी 11, टि.जी 17, टि.ए.जी 24, आय.सी.एस. 11, एम 13 खरीपा करिता बी. 95, फुले प्रगती, टि.एम. व्ही. 10 हे वाण निवडावे. बाजारात सुध्दा संकरित व सुधारीत बरेच वाण उपलब्ध असतात. उन्हाळी भुईमुंग लागवड करतांना पाण्याचे नियोजन आपल्याकडे व्यवस्थित आहे काय याचा विचार करावा.

♦️ बियाणे प्रक्रिया : प्रति एकरी 40 किलो बियाणे घेवून त्यास बीज प्रक्रिया करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
स्कायगोल्ड जेल 100 ग्राम
बावीस्टीन 100 ग्राम
♦️ या दोन्ही घटकांचे द्रावण तयार करून बीज प्रक्रिया करावी व रात्रभर वाळु द्यावे. डिसेंबर अखेर किंवा जानेवारी पहिल्या आठवड्यात पेरणी करुन मे महिन्यात पिक काढल्यावर खरीपा करिता जमिन तयार करता येईल.

♦️ भुईमुंग पेरणी : ओल करून वाफसा झाल्यावर पाभरीच्या साहायाने अथवा टोकन पध्दतीने पेरणी करावी. साधारणत: दोन ओळीतील अंतर 12 इंच (1 फुट) दोन रोपातील अंतर 6 इंच ठेवावे. पसऱ्या जातीसाठी दोन ओळीतील अंतर दिड फुटाचे ठेवावे. बियाणे 2 ते 3 इंच खोल मातीत पेरावे. पेरणी टोकन पध्दतीने केल्यास एका ठिकाणी दोन (2) बिया टाकाव्या, जास्त उताराच्या जमिनीवर पेरणी उताराच्या आडव्या दिशेने करावी. उगवणीच्या काळात कावळे व इतर पक्षी बियाणे खातात या वेळसे राखण करावी व नांगे आढळून आल्यास ताबडतोब भरावे.

( प्रति एकरी यांचे मिश्रण पेरावे )
डि.ए.पी 1 बॅग
सुफर्ट 10 किलो
युरीया 25 किलो
ब्लॅक डायमंड 10 किलो
पोटॅश 25 किलो
♦️ पेरणी सोबत शक्य नसल्यास नंतरही खत देता येते. भुईमुंगास जास्त पाणी दिले गेले तर पाने पिवळी पडतात. अशा वेळेसे पानावरील अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते तसेच लोह व जस्त कमी असल्यास पाने पिवळी पडतात अशा वेळेस ----- प्रति एकरी शिंपल्यास वरील समस्या आटोक्यात येईल
( प्रमाण : प्रति एकर )
सुफर्ट 10 किलो
युरीया 25 किलो

♦️ पहिली फवारणी : लागवडीपासुन 22 ते 24 दिवसात पहिली फवारणी करावी म्हणजे भरपूर फुटवे तयार होतील व पांढऱ्या मुळया सुदृढ होतील.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
स्कायगोल्ड जेल 25 ग्राम
मॅकप्लस 5 मि.ली
फायर-101 25 मी.ली
महाझिंक 20 ग्राम

♦️ अधिक पातळ झाले असल्यास या फवारणी नंतर अधिक फुटवे लागण्यास मद्त होते.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
चॅम्पियन 1 मिली
गोल्ड रूट टॅबलेट 1 गोळी

♦️ दुसरी फवारणी : पेरणी पासुन 40 ते 45 दिवसात करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
अविष्कार 5 मि.ली
शक्तिमान गोल्ड 25 मी.ली
रोको 20 ग्राम
सोनाटा - 70 20 मि.ली

♦️ या फवारणी नंतर 5 दिवसाच्या अंतराने खालील फवारणी केल्यास पुन्हा अधिक शेंगा लागण्यास मद्त होते.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
फ्लॉवर किंग 1 मिली
फायर-101 25 मी.ली

♦️ या वेळेस फुलकिडे, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव असतो. पिक वाढीच्या तसेच फुलोऱ्याच्या अवस्थेपासुन शेंगा तयार होण्याच्या अवस्थेपर्यंत पिकाला भरपूर ओलाव्याची आवश्यकता असते. काढणीच्या 20 दिवस अगोदर पासुन पाण्याची गरज कमी होते. उन्हाळी लागवडीत 8 ते 10 दिवसात मध्यम जमिनीला व 12 ते 15 दिवसाच्या अंतराने भारी जमिनीला पाण्याचे नियोजन करावे. शेंगा तयार होण्याची अवस्था 60 ते 65 दिवसानंतर चालु होते. यावेळेस एक आळवणी करावी.

♦️ आळवणी :
स्कायगोल्ड जेल 100 ग्राम
जीब्रॅक्स 100 मिली

♦️ यानंतर लगेच 4-5 दिवसांत फवारणी करावी.
( प्रमाण : प्रति 15 लिटर पपं )
तेजस 25 ग्राम
संपदा 25 ग्राम
सोनाटा-70 25 मि.ली

♦️ यानंतर 2 ते 3 दिवसात खताची दुसरी मात्रा खालील प्रमाणे द्यावी व पाणी द्यावे.
( प्रमाण : प्रति एकर )
पोटॅश 25 किलो
विघ्नहर्ता विकास किट 25 किलो
20:20:0:13 1 बॅग

♦️ आऱ्या जमिनीत घुसण्याची अवस्था 50 ते 60 दिवसात येते, यावेळेस एनर्जी हे जिवाणू असलेले द्रावण प्रति एकरी 2 लि. सोडावे. म्हणजे जमिन भुसभूशीत होवून आऱ्या जमिनीत व्यवस्थित घुसतील व जमिन टनक राहणार नाही.

♦️ पिकाची काढणी : पिक परिपक्व झाल्यानंतर पाने पिवळी पडून गळू लागतात व शेंगाच्या टरफलाची आतील बाजु काळसर दिसते. अश्यावेळेसच पिक काढावे. साधारणपणे 10 क्विंटल पर्यंत प्रति एकरी वाळलेले शेंगांचे उत्पादन घेता येईल.

♦️ या नंतर प्रत्येक 10 दिवसाला विद्राव्य खते सोडावी.
(प्रमाण : प्रति एकर)
19:19:19 8 किलो
12:61:0 8 किलो
13:0:45 8 किलो
0:0:50 8 किलो

♦️ वरील सर्व खत 10 दिवसाच्या अंतराने तीनदा सोडावे म्हणजे 24- 24 किलो प्रत्येक खत ठिबक व्दारे सोडण्यात येणार आहे व याला चार महिने म्हणजे (120 दिवस) लागणार आहे. नोव्हेंबर महिन्यात 5 तारखेपासुन 12 तारखेपर्यंत खालील दोन घटक न चुकता सोडावयाचे आहे.
( प्रमाण : प्रति एकर )
स्कायगोल्ड जेल 1 किलो
ब्ल्यूकाँपर 50 ग्राम
जीब्रॅक्स 1 लिटर


♦️ टिप : पिकाला कोरे तणनाशक वापरु नये प्रत्येक पंपात 20 ग्राम स्काय गोल्ड जेल किंवा कॅप्टन - 30 मि.ली टाकणे आवश्यक आहे. जर चुकून आपल्या पिकाला कंद अळी लागली व सड लागत असेल तर प्रति एकरी डेन्टासु 100 ग्राम किंवा लिसेंन्टा 100 ग्राम किंवा डेसिस 100 मि.ली या पैकी कोणतेही एक व फायर -101 - 250 मि.ली. सोडल्यास (प्रति एकरी) कंद अळी किंवा हुमणी वरती येऊन मरेल.
Scroll to Top